गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबीत असलेला पाथरगोटा ग्रामपंचायती चा प्रश्न माजी आमदार हा गजबे यानी शासनदरबारी पाठपुरावा करुन पळसगाव ग्रामपंचायत मधून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून पाथरगोटा नुकतीच अस्तित्वात आली
पाथरगोटा या गावातील 1100 लोकसख्या बघता पाहीजे तेवढ्या सोईसूवीधाचा लाभ शासनाकडून मिळत नसल्याने, येथील गावकरी यांनी अनेक प्रयन्त केले
पाथरगोटा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मीळावा. यासाठी वारंवार गावकरी आणि माजी आमदार कृष्णा गजभे यांनी प्रयत्न केले
गावात उन्हाळयामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत होते. व गावात विद्युत खांबावर अपूरे पथदीवे गावात नाली-रस्ते नाही यामूळे पावसाळ्यात देखील येथील नागरीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागंत होते गावातील ही परिस्थिती बघता माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या निधीतून गावात सभामंडप रोड नाली असे अनेक विकास कामे निधीतून करून दिले परंतु गाव मोठा असल्याने हे सोयीसुविधा पुरेशी नव्हते त्यामुळे त्यांनी स्वतः या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत तिचा दर्जा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि माजी आमदार कृष्णा गजबे साहेबांनी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव बनवून ते जिल्हा परिषद मार्फतीने शासन स्तरावर मंत्रालयात स्वतः टेबल फाईल हलवून दिनांक 20 जून 2025 रोजी शासनाने उपसचिव यांच्या आदेशाने अधिसूचना निर्गमित झाली आणि दिनांक 26 /6 /2025 ला महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गट ग्रामपंचायत पळसगाव चे विभाजन करून नव्याने ग्रामपंचायत पाथरगोटा या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतची अधिक सूचना निघाली आणि पाथरगोटा ग्रामपंचायतींच्या आनंद भरभरून वाहत होता याबद्दल गावकऱ्यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांचा गावात बॅनर लावून आभार मानले मात्र ही ग्रामपंचायत अस्तित्वात निर्माण झाली परंतु या गावांमध्ये
आदिवासी विभागाशी ची लोकसंख्या नसताना सुद्धा नव्याने आरक्षण काढल्यानंतर पाथरगोटा या गावाचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असल्याने हा प्रशासनाचा भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे कारण सन 1980 - 85 या राज्य शासनाच्या निघालेल्या पेसा अंतर्गत अधिसूचनेमध्ये नवरगाव आणि पाथरगोटा हे दोन्ही गाव पेसाच्या यादीत असल्याने सरपंच पद पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी राखीव गेल्याने येथील इतर समाजाच्या लोकांचा हिरमोड झालेला प्रामुख्याने आरक्षणाच्या वेळी दिसून आला