कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : सन 2015 मागील आठ वर्षापासून बार्टीच्या माध्यमातून अनुभवी समतादूत मनुष्यबळ समाजकल्याण विभागाच्या विविध योजना गाव व तालुकास्तरावर प्रभावीपणे राबवण्याचे काम करत आहे.प्रत्येक्ष गरजू लाभार्थ्यांना लाभ पोहोचविण्यासाठी अविरत कार्य करीत आहे.शाहू,फुले,आंबेडकर,संत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत नेण्याचे कार्य समतादूत करीत आहेत. समतादूत यांचे समाजकल्याण विभागात समायोजन करून समाजकल्याण विभागाचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करण्यात यावे यासाठी समतादूतांनी वेळोवेळी शासन दरबारी, मंत्रालयात, निवेदनाद्वारे मागणी सादर केली होती.समतादूतांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय कक्ष अधिकारी प्र.वि. देशमुख यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी महासंचालक बार्टी यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते.त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे दिनांक 18 मे 2023 रोजी प्र.वि.देशमुख कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये मध्ये समायोजन करण्याबाबत 114 पाणी स्वयंस्पष्ट सकारात्मक अहवाल शासनास सादर केलेला आहे.व समतादूत यांना समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन केल्यास त्याचा लाभ अनुसूचित जातीच्या लोकांना होईल हे अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. परंतु अद्यापही सदरील अहवाल मंत्रालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आलेला असून तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय व समतादूत यांचे शासन सेवेमध्ये समायोजन याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी व सामाजिक न्यायविभागमध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व समतादूत 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून बार्टी मुख्यालय पुणे ते मुंबई मंत्रायला पायी लॉंग मार्च काढत आहेत.सामाजिक न्याय खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून मुख्यमंत्री साहेबांनी अनुभवी समतादूत यांचे शासन सेवेत समायोजन करून तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय सुरू करावे व शासन आपल्या दारी संकल्पना खऱ्या अर्थाने पुर्ण करावी ही मागणी समतादूत व तळागाळातील नागरिकांच्या वतीने करण्यात आलेली आहे.