तालुक्यात १० दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरुन वाहू लागले आहे. सतत धार पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी अधिक चिंता ग्रस्त झाला आहे तर अनेकांची घरे कोसळली आहेत शिवाय पशु धनाची सुद्धा फार मोठी हानी झाली आहे.त्या करिता ब्रम्हपुरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्यात यावी दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे,ज्यांच्या घरांची पडझड झाली त्यांना तातडीने घरकुल मंजूर करावे.तसेच ज्या शेतकऱ्यांनच्या पशू धनाची नुकसान झाली त्यांना योग्य नुकसानभरपाई द्या यासह शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी नेते कॉ विनोद झोडगे यांनी केले आहे
.सविस्तर असे की ब्रम्हपुरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांवर आधीच दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी करावी लागली आहे या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत.शिवाय त्यात अतिवृष्टी हे चित्र मात्र शेतकऱ्यांना पहावसे वाटत नाही.काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत असल्यामुळे तालुक्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी चक्क शेतातून वाहात असल्याने काही शेतात पाणी देखील साचून राहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.यात धान, सोयाबीन, कपास,भाजीपाला ,तुर या सारख्या पिकांची माती सह रोपटे वाहुन गेले आहे.त्यामुळे ब्रम्हपुरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची नुसकान भरपाई देण्यात यांवी अशी मागणी समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे किसान कामगार नेते कॉ विनोद झोडगे यांनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केले आहे.