आरमोरी- तालुक्यातील पाथरगोटा गावाला नुकताच स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला असल्यामुळे त्यागावाला विकासाची गती देण्यासाठी निधी उपलब्धतेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार तसेच हे गाव पहिलें पासून पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे सरपंच आरक्षण आदिवासी निघाले परंतु या ठिकाणी आदिवासी ची संख्या नसल्यात जमा असल्याने येथील गावकऱ्यांनी आपल्या कडे आरक्षण बदलण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेऊन आपण राष्ट्रपती , राज्यपाल आणि राज्य व केद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे असे आमदार रामदास मसराम सांगितले.
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे आज शारदा उत्सव मंडळाच्या वतीने स्वाकृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यावेळी आमदार मसराम उद्घाटक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सदस्या वृंदाताई गजभिये गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष दिलीप घोडाम जेष्ठ कार्यकर्ते आनंदराव राऊत विठ्ठल नखाते धनपाल मिसार सर ढोरे सर विठ्ठल नखाते देवचद दोनाडकर योगेश ढोरे सर जगन कराकर युवराज बुलै बाळकृष्ण कराकर काशीनाथ दोनाडकर ज्ञानेश्वर अलोने महेश कुथे किशोर कराकर यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.