उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला,भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे
ना .राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
ना .सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
ना .चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
ना .विजयकुमार गावित- नंदुरबार,
ना .गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
ना .गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा
ना .दादा भुसे- नाशिक,
ना . संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
ना .सुरेश खाडे- सांगली,
ना .संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
ना .उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
ना .तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
ना .रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
ना .अब्दुल सत्तार- हिंगोली,
ना .दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
ना .अतुल सावे - जालना, बीड,
ना .शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
ना . मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांच्या मागणीला मिळाले यश !
मंत्रीमंडळात ना. संजयभाऊ राठोड यांचा समावेश मंत्रीमंडळात होताच कारंजा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी पेढे वाटून जल्लोष केला होता तसेच ना एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महोदय यांचेकडे विविध वृत्तपत्राद्वारे, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. संजयभाऊ राठोड यांची निवड करावी ही मागणी लावून धरली होती. अखेर ना. संजयभाऊ राठोड यांची निवड होताच सिद्धयोगी रामनाथ महाराजांनी आपलं साकडं पूर्ण केल्याचे मनोगत प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी व्यक्त केले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....